चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे
"परंपरा "
"सगळ ताट स्वच्छ झालं पाहिजे.
बाबांच ताट बघ, कीती ! स्वच्छ आहे ."
एक शीत जरी टाकलस, तरी अन्न शाप देत बघ !
"आई प्लीज, काहीतरीच सांगू नकोस ,
अन्न कशाला शाप देईल? ."
अस म्हणत योगन हसला.
"अरे अन्न हे पूर्णब्रह्म असत ."
"तू ताटात सोडलेले एक शीत कीती मोठा आणि कठीण प्रवास करून येतं माहीती आहे तूला. "
"ऊन्हात तापलेली जमीन स्वतःची छाती नांगरून घेते ,
पावसात चिंब होते ,
बीज अंकुरते , कोवळ्या लहानशा रोपांना उपटून दूसर्या ठीकाणी लागवड होते
तू जेव्हा घरात शांत झोपलेला असतोस ना .........
तेव्हा ते शेतात
.... ....पाऊस .......वारा........ थंडी अंधारी रात्र........ सारं सारं सहन करत बिचारे चिखलात पाय रोवून ऊभे असते. .......
रोप बहरत ..... पक्वते नंतर ....... ते स्वतः ला झोडून घेत .............. बैलाच्या पायी खाली मळून देखील घेत. .... ......नंतर जीव घूसमटवणार्या पोत्यांमध्ये स्वतः कोंडून घेत. .......
मोठ्या गिरण्यांच्या अजस्त्र दगडांमध्ये तूला पांढरा शूभ्र भात हवा म्हणून स्वताचे शरीर सोलवटून घेते. .....
शूभ्र तांदूळ होण्यासाठी. ..
...........नंतर ....दूकानातून आपल्या घरी येवून कूकरमध्ये स्वतः ला ऊकळत्या पाण्यात शिजवून घेते.
...... ....ईतका प्रवास ........... ईतका त्रास .......... कशाकरता तर ........
केवळ एक आणि एकमेव जीवन ऊदेश. .
" की ..कोणातरी भूकेल्याच्या मूखात पडावं......................... त्याची क्षुधा....भूक शांत व्हावी म्हणून. ..........."
आणि तू मात्र अगदी ताटात येवूनही जर "त्याला " टाकून खरकट करून मातीमोल करणार असशील तर ते शाप दिल्याशिवाय राहील काय ?
"हे बघ केल स्वच्छ ताट "
" आता नकोस बोलू "
अस म्हणत योगन ताटावरून ऊठला.
मंडळी खरं आहे ......
प्रत्येकाने अगदी एक घास जरी अन्न वाया घालवले, तर केवळ भारताचा विचार केला तर 125 कोटी लोक केवळ. ..................
एक वेळच्या जेवणात जवळपास 12 लक्ष कीलों अन्नाची नासाडी करतात
....तर दिवसाचा व वर्षाचा हिशेब काय असेल. ......???????
केवळ अन्नच नव्हे तर त्या साठी लागणारी क्रयशक्ती, श्रमशक्ती , अर्थशक्ती, नैसर्गिक संपत्ती सगळं सगळं वाया जात असतं...
" ऋचा कीती ग खरकट दिसतय तूझ ताट .........
चल सगळ नीट स्वच्छ कर एकही शीत शिल्लक नको ताटात."
..... ..बाबां चे ताट बघ, कीती स्वच्छ आहे ते. ........................अन्न टाकू नये शाप देत आपल्याला. .......तूला सांगते हे एक शीत.....ईति माझी पत्नी. ....... ............................................................................................................................
शाळेत म्हटली जाणारी प्रतिज्ञा एका वेगळ्या अर्थाने समोर येत होती
माझ्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. .....🇮🇳
🌈 माझी लेखनयात्रा
No comments:
Post a Comment