चिंतनिका जीवन एक " संघर्ष "
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे
" पाचर "
परवा अनेक प्रेमीयूगूल माळशेज घाटात माकडांना बिस्किटे देताना पाहिली ...तो तिच्या हातात एक एक बिस्किट देत होता. ..ती हवेत भिरकावत होती. ...माकडे ऊड्या मारून पकडत होती. .....एका अर्थी दोघांच्याही माकड चेष्टा सूरू होत्या. ..
सहजच मनातल्या मनातल एका पीजे केला ," ही या माकडाला एवढा जीव लावते तर जो खेटून ऊभा आहे त्याला किती जीव लावेल 😄
आणि माकडांच्या टोळीची वाचलेली गोष्ट आठवली
....झाडांवर एक माकडांची टोळी रहात होती. .लांब शेपटीची.....भली थोराड माकड. ...
जवळच खाली सूतार करवतीने लाकडाचे ओंडके कापीत होते. ..त्यात माकडांचे भारी लक्ष. ...दूपारी विश्रांती ला सूतार मंडळी गेल्यावर. ..भला थोरला टोळी नायक माकडोबा खाली उतरला. ...कापलेल्या ओंडक्याच्या फटीत शेपूट सोडून ऐटीत पाचरीला हात लावला. ......फट्याक ........ पाचरीने काम चोख बजावले......शेपूट तूटली .........तोबा ... तोबा. .....ओय ...ओय. .... काय करावे ? रडावे ? ....ओरडावे तर ....हसे होईल. .......मग उसने अवसान आणून हसून म्हणाला. ....व्वा फारच छान. ..काय गार वाटतय. ..
..झाल .......मग काय. .......... ...एकेक करत माकड खाली उतरत गेली. ...
शेपट्या तूटतं गेल्या ...पण
" हू नाही की चू नाही " वेदना होऊनही. ..कीती छान ! मस्तच. .........
सहनही होत नाही सांगताही येत नाही. ........ज्याने खाल्ला तो व नाही खाल्ला तो ही. .......असा हा लग्नाचा लाडू .......पण तरीही आपण तो खातोच. ..
सजवून -धजवून, वाजत - गाजत एका नव्या जीवाला आपल्या घरी आणतो. ......नव्याची नवलाई संपली की ....मालकीची, स्वामित्व, स्वाभिमान, मान, ईत्यादी भावना जागृत होतात आणि भांड्याला भांडे लागते. .....
कूरघोडीच्या प्रयत्नात वरातीमधील घोडा गाढव वाटू लागतो. .........
कायद्याच्या नजरेत लग्न हा करार असेलही पण "करार " आणि "कूरकूर" हे एकाच अक्षरांपासून का बर झाले असावेत ?
"तो " कीती कमवतो या पेक्षा तो "तिच्या " साठी कमवतो ही जाणीव "ती" विसरते ....
आणि आधी चंद्र चांदणे तोडून आणायला निघालेला " तो " कीराणा , दळण आणताना त्रागा करू लागतो. ....
एव्हाना दोघांनाही एकमेकांच्या गूणांपेक्षा दोषच ठळकपणे अधोरेखित झालेले असतात. ...........अशा वेळी कोणीतरी एकाने तडजोडी चे खोडरबर घेवून या आधोरेखा खोडायच्या असतात. ....पण अखेर खोडरबरच ते झिजणार असत ...म्हणून एकानच न वापरता आळीपाळीने पूरवून पूरवून वापरले की संपत नाही. ..
कूरबूरी होणारच. ..पण तेढ वाढणार नाही याची काळजी घ्यावी. ....
कारण कितीही फारकतले तरी लग्न म्हणजे "पाचर " थोडीच आहे आणि आपला पूर्वज जरी 'तो 'असला तरी आपण माकड थोडीच आहोत.
🌈 माझी लेखनयात्रा
Mast
ReplyDeleteMast
ReplyDeleteThoughtful...
ReplyDeleteThoughtful...
ReplyDeleteछान . सचित्र
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete