Sunday, 14 February 2016

देवाघरचे लेणे

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

              योगेश जोशी
           वज्रेश्वरी / ठाणे

      🌹 देवाघरचे  लेणे 🌹

प्रेम  म्हणजे  प्रेम म्हणजे प्रेम असतं
तूमचं आणि  आमच  सेम  असतं  !

वयाच्या  निरनिराळ्या टप्प्यात  वेगवेगळ्या  आशयाच्या  कविता  आवडू  लागतात.

पण  पाडगांवकरांच्या  ह्या  ओळी  मात्र  स्थल, काल, वयाचे  बंधन ,मर्यादा  न  मानता  प्रत्येक  टप्प्यावर  भावतात , आनंद  देऊन जातात. एक  वैश्विक  सत्य  सांगतात.

             अगदी  कोणतीही  पूर्वसूचना  न देता  ,ध्यानीमनी नसताना  ,अचानक,  अकस्मात्, पणे   "ते " घडेल .

           मी  प्रेमात  पडलो  म्हणण्यापेक्षा प्रेमच तूम्हाला  शोधून  काढेल.
             अचानकपणे  आभाळ  भरून  याव  आणि  वळिवाच्या  जोरदार  सरींमध्ये तन - मन  चिंब भिजून  जावे. ...अगदी  तस्सेच. .....
तसेच  होईल  प्रेम .

संकट  दूख  आल्यावर  सहजपणे  तक्रार  येते  की
, या  ईतक्या  असंख्य  लोकांच्या  भाऊगर्दीत  माझ्याच  वाट्याला  का  हे  सारे  ???,
   अगदी  तसेच  प्रेमाचही...ईतक्या  भाऊगर्दी  त  मीच  का  ? ?????

ह्या  प्रश्नाचे उत्तर  नसते.

होकार, - नकार,  
शक्य-  अशक्य '
सार -असार ,
नीती - अनिती
, रिती -भाती, 
जाती - पाती,

ह्या  सार्‍या  निसरड्या  अवघड  पायवाटा  ओलांडून  " ते " अलगद पणे  तूमच्या  बोटांवर  विसावेल..

    अगदी  पूष्करणीतील अनेकविध फूलांमधून  नेमक्या  फूलावर बसणार्‍या  फूलपाखरा प्रमाणे. ..

अस  झाल  की  तूम्ही  गोंधळाल.......अस्वस्थ  व्हाल. ....विचारात  पडाल. .....हे सार  समजायला .....उमगायला. ...नक्कीच  थोडा  वेळ  लागेल.

.....त्याला  प्रतिक्रिया  देवू   ? की  प्रतिसाद   द्यावा  ? ....... आणि  द्यावा  तर  कसा द्यावा  ????,,

या संभ्रमात , द्विधा मनस्थितीत  नक्कीच  थोडा  वेळ  जाईल ......
काय  हे भलतच ? काय  हे  ? अस  कस  ??

ह्या  सार्‍या  प्रश्नांच्या गोंधळातही   जर  तूमच्या  ह्रदयाचा  एखादा  ठोका  चूकत  असेल. ..तर. ...तर. ...तर  काय  ?

अहो पूढे  होऊन  प्रेमाला  अलिंगन द्या.  मूक्त  हस्ते  स्विकार  करा. ......पण  डोळसपणे  बर. ...

प्रेम  भिन्न  भिन्न  लोकांना अगदी   समीप  आणते  पण  जवळ  येताना  दूराव्याच्या  काही  नियमांचे  भान  हवे ...नाहीतर  सतारीच्या  सूरांची 'सम ' गाठता  येत  नाही.

पाडगावकर  म्हणतात ...

"ईतके  आलो  जवळजवळ  की        .    .    जवळपणाचे झाले  बंधन ,
उमटावयाला  सूर  हवे , तर  हवेच      .       तारांमधूनी अंतर. .."

प्रेमात एकदूसर्याला बांधण्यापेक्षा बांधिलकी  महत्वाची  , नाही  का  ?

अहो प्रेमात  आशा - अपेक्षा  ईच्छा  ह्या  असणारच
  पण  त्याच  बरोबर  मनाच्या  मर्यादा व बूद्धीची मान्यता  ही तितकीच  महत्वाची. ..नाही  का?

प्रेमाची  लांबी - रूंदी  ची  परिमाणे मोजण्यापेक्षा...खोली  महत्वाची. ..नाही का  ?

प्रेम  मनाच्या तळापासून  उन्मूत्त,  ,  ऊत्फूर्त, आणि  अनिवार  असावे  पण  चौखूर  ऊधळलेले नक्कीच  नसावे. ..

प्रेम  पवित्र , शांत,  संयमी,  शालिन असावे  पण  अगतिक  व  लाचार  नसावे. ....

प्रेमात  हार -जीत , यश -अपयश  अस  नसतच  मूळी. ..अपयशी  झालात  तरीही  प्रेम  वेगळ्या  अंगाने, वेगळ्या  रंगाने; वेगळ्या  रूपात  तूम्हाला  पून्हा  भेटणारच  असते. ..खात्रीने. ..फक्त  ओळखणारी  नजर  हवी.

ऊगीचच त्याला कोणत्याही  अटी  शर्ती  व करारात  अडकवू  नये
कारण  प्रेम  म्हणजे  काही  सरकारी  "दस्तावेज " नाही  तर  "दिलों  की  दास्तान है "

तेव्हा  प्रेम  भरभरून  करा ...
हातच  न राखता....कारण  जितकी  पखरण  कराल ..... ऊधळण  कराल  त्याचा  कैक  पटीने  परत  मिळेल
. ..प्रेम  जोडा व जोपासा ...

   " प्रेम   घरावर , व कुटुंबावर  करा
       आणि  जगावरही   करा "

" प्रेम आपल्या छंद आवडीवर  करा  आणि कामावर,  कर्तव्यावरही करा"

  " प्रेम  सोने -नाणे संपत्तीवर करा
आणि त्या 'अर्थ' चा अनर्थ न  करणार्‍या  सदबूद्धीवर करा "

"प्रेम लाडक्या  गाडीवर अलिशान   बंगल्यावर  करा "
आणि  निसर्गाच्या कलाकृतीवर ही
करा "

"प्रेम  गीत-संगीत, नृत्य  व सूंदर  चित्रांवर  करा
आणि  अनूपम सूंदर  चरित्रावरही करा "

"प्रेम  स्वतःच्या गूणांवर ,सौंदर्यावर  करा
आणि  ही  जाणीव  करून  देणार्‍या "प्रेरणे"वरही  करा ।

मंडळी  प्रेम  हे  सौभाग्य आहे ...अलंकार  आहे  ..प्रत्येकाला  मिळेलच  असे नाही  तेव्हा  त्याचा  आदर  करा. ..दवडू  नका. .अभिमानाने  मिरवा पण  प्रदर्शन  मांडू  नका. .....

.कारण ...' प्रेम'  हा दर्शनाचा  विषय आहे  प्रदर्शनाचा नाही.

म्हणून  मनस्वी  प्रेम  करा. .

रोजच्या  निकटच्या  सहवासात  तर  होईलच  प्रेम  व्यक्त
पण  दूरत्वानेही परस्परातील  धागा  न  विरता ते  राहत  अभंग ..

पाडगांवकरांच्या  ओळी  आठवल्या
       "  सोबतीला  चंद्र देते
         अंतरीचा  ध्यास  देते
         तू  जिथे  जाशील  तेथे
        मी तूला  विश्वास  देते  "

विश्वासाने  ज्या  खांद्यावर  डोकं  टेकाव  अस  प्रेम  म्हणजे......

         "देवाघरचे  लेणे  "

त्याची  'भक्ती ' केली  की  जगण्याची  नवी ' शक्ती ' मिळते ।

अशीच  जगण्याची  नवी  शक्ति  देणार्या  माझ्या  " प्रिय सखीस "       .        फक्त  दोनच  ओळी ....

     "तू  छान  आहेस "
              आणि
"मला तू खूप  आवडतेस "

🌈  माझी लेखनयात्रा

No comments:

Post a Comment