Friday 21 October 2016

भारत कधी कधीच माझा देश आहे

माझी  लेखनयात्रा
.       *जीवन एक संघर्ष*

* *वाचा  विचार करा पण  थांबू  नका* *

सध्या  चर्चा  सूरू  आहे  ती  पाकिस्तानी सिनेकलावंताचा सहभाग  असलेल्या  चित्रपटाच्या प्रदर्शन विषयी ,

त्यासाठी  सरकारी संरक्षणाविषयी,

बघावा  की  बघू  नये  या विषयी.

बाॅलिवूडचा कळवळा  असणारे  व  स्वताला  ऊच्चविद्याविभूषित  म्हणवणारे  नतद्रष्ट  असे  म्हणतात   की  कला ही  कला असते  तिला  धर्म , प्रांत या बंधनात  अडकवता कामा नये.
दोन  देशातील  वैर खेळाडू  तसेच कलाकारांमध्ये कशाला ???
कलेशी ,कलाकारांशी  आपले  वैर कशाला. ....???  वैगरे .वैगरे

*हे सगळं ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते*

मग  दोन  देशांतील  वैर  नेमके  असत  कोणात  हो  ?

त्या सीमेवर  हाड  गोठवणार्या  थंडीत  कूडकूडणार्रा  सैनिकांमध्ये
असते की  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  दूर्गम भागात  छातीचा  कोट  करून  ऊभ्या असलेल्या  जवानांमध्ये  असते 
की  घरदार  मूलंबाळ,  संसार , लांब  सोडून  जीवावर उदार  होऊन  सीमेवर  डोळ्यात तेल  घालून  गस्त  घालत  पहारा  देणार्‍या  सैनिकांमध्ये असते का वैर ?

*त्या  पाकिस्तानी  सैनिकाबरोबर कशाला भारतीय  जवानाने   वैर  घ्यायचे ? त्यानी ऐकमेकांचे वैयक्तिक अस काय वाईट  केल  आहे ?

अरे अकलेच्या  खंदकांनो आमचा  सैनिक त्याच्या  रक्ताने माझ्या देशाच्या सीमा आखतो  म्हणूनच  तूमच्या सारखे कृतघ्न  कलाकार  उघडे नागडे नाचून कोट्यधीश होऊ शकतात ... बेताल  बोलू  शकतात.... 
ईथलेच खाऊन  ईथेच  गरळ  ओकू  शकतात ... .

पण बाॅलिवूड सम्राटांनो हा दोष  तूमचा नाही आम्हीच  षंढ  झालो  आहोत

आमची देशभक्ती फक्तं 15 ऑगस्ट ला तिरंग्याचा डीपी  आणि  ऊरी सारख्या  हल्यानंतर "भावपूर्ण  श्रध्दांजलि "अमर  रहे "किंवा  आंख   मे  भर  लो पानी या  रिंगटोन मर्यादेपूरती दिखावू बेगडी  असते  .

*कारण कधी कधीच भारत माझा देश  असतो*  .

👉पण आता  मात्र या वेळी  हा समज  खोटा  ठरवायचा  आहे

🇧🇴बांधवांनो ऊरीतील शहीदांचा बदला  तर  आपल्या  सैनिकांनी घेतला  आहे 

आता आपली म्हणजे  सामान्य  भारतीय🇧🇴  नागरिकाची  वेळ  आली आहे बदला घ्यायची

आपल्या कृतीतून दाखवून  देवू  आपल्या  सैनिकांना  तूम्ही  एकटेच  लढत  नाहीत तर  आम्हीही  आहोत  सोबतीला .🇧🇴

ईतका  कडक  बहीष्कार घालूया  यांच्या  चित्रपटावर  की  डोयरकीपर पण  म्हणायला  हवेत  की  नोकरी  गेली  तरी  चालेल  पण  मी सूद्धा चित्रपटगृहात आत  जाणार नाही
हीच  खर्या अर्थाने  ऊरीतील  हूतात्मा जवानांना सूजाण सूज्ञ  व  कर्तव्यदक्ष नागरीकांकडून खरी  श्रद्धांजली  ठरेल 💐

आणि  तरीही कोणी  जर  चित्रपट  पहायला गेला तर तो  **  *** ** ***  

संस्कार व पेशा या मूळे मला फूल्या फूल्या लिहायला भाग पडते आहे
  पण सूज्ञ वाचक  त्या अचूक  भरतील  ही खात्री

जय हिंद 🇧🇴
वंदे मातरम

योगेश जोशी
वज्रेश्वरी /ठाणे

*टिप* :कृपया जास्तीत जास्त  शेअर  करा.. नावाशिवाय   शेअर   केल  तरीही  चालेल देशभक्तीला काॅपीराइट  नाही
कोणी हिंदीत  अनूवाद केला  तरी चालेल  जास्तीत जास्त  जणांपर्यत शेअर  करा
आणि  हो कोणत्याही  गरीब  कलाकार  किंवा तंत्रज्ञ यांचे  पैसे या चित्रपटात  अडकलेले  नाहीत
  आता फक्त  आपल्या भारतीयांच्या जीवावर मोठे झालेल्या  चार  दोन गर्विष्ठ  धनाढ्यांचा नफा  अडकलेला  आहे