Tuesday 22 March 2016

"राजगृहातील वनवास "


चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

               " राजगृहातील  वनवास  "

"बाबा रामायणातील  लक्ष्मणाच्या  पत्नी  चे  नाव  काय  हो  ?"

माझ्या  मूलगी  ऋचा च्या  या  प्रश्नाने  मी  गोंधळून गेलो .

"अग  ते  आपलं.....
  , हे  ....काय ....
...ते  म्हणजे". ........
.अग ..  ...तोंडावर  आहे........
पण. .येत. .. नाही  ...
"आपल  ...हे..."......." ते ......".

आणि  मला लक्षात  आलं.....
  की  हे  आपल्याला " आठवत "  नाही  किंवा  कधी  "लक्षातच  ठेवलेले  नाही, जाणीवपूर्वक!

राम -सीतेसह चौदा  वर्षे  वनवासात  सावली  बनून  राहणारा  सावत्र भाऊ  "लक्ष्मण " हा " आदर्श  बंधू, " "आदर्श  दीर " , व स्वतःच्या पत्नी  ला  चौदा  वर्षे  राजगृही  वनवासाहूनही खडतर  अशा  पतीवियोगात सोडणारा  म्हणून  "वैराग्याचा  पूतळा "  म्हणून  गौरवला जातो. ..
...
पण  त्याच  वेळी  कोणतीही  चूक  नसताना  चौदा वर्षे  पतीवियोगात  राजगृही  वनवासात  भोगणाऱ्या  त्याच्या  पत्नीची  दखल महर्षी  वाल्मिकी  नी  घेवू  नये. ...

तिच्या  व्याकूळ  मनोअवस्थेचे  , संतापाची  योग्य  ती  दखल.......योग्य ते   वर्णन  ही  करू  नये .......

चौदा वर्षे  पत्नी  पासून  दूर  राहून  जर  लक्ष्मण  वैराग्याची  मूर्ती,  आदर्श  बंधू. ...आणि  राम -सीतेसह  देवत्व  प्राप्त  करत  असेल. .तर
त्याच्या   पत्नी  ला    "त्यागाची  मूर्ती,"  "वैराग्य शिरोमणी ,"वंदनीय, " पूजनीय "म्हणुन  का मान्यता मिळू  नये. ..........का बरं  तिचे साध " नाव " सूद्धा  आम्हाला  पटकन  आठवू  नये. ..

प्रकाश  देणार्या  समईचे कौतुक  होते  पण  स्वतः  ला  जाळून  घेणारी  वात  खिजगणतीतही  नसते........

आपल्या  अवती  भोवती  कदाचित  अशा  वाती  असू  शकतील .......
आई. .पत्नी. .बहीण. ..वहीनी. ..अनेक  रूपात. ......

वाल्मिकी  नी  केलेली  चूक  आपण  का  करायची  ?

त्या  जळणार्या  वातीला फक्त  ईतकच म्हणून  बघा

   " कीती  करतेस  गं  तू  ?
   "थकत  कशी  नाहीस  ?
"लक्षच  देता नाही  आले  तूझ्याकडे !"

मी खात्रीने  सांगतो  असं   म्हटल्यावर
त्या  राजगृही  वनवासाहूनही  खडतर  अशा  दूःखात  कूढणार्या ""ऊर्मिले"" चे  डोळे  पाण्याने  भरून  येतील  व  सारा  वनवास सूफल  संपूर्ण  होईल. .

मग  म्हणणार  ना  आजच  !

🙏चिंतनिका जीवन एक " संघर्ष "    
योगेश जोशी 

9967766451
वज्रेश्वरी / ठाणे 

आवडल्यास  शेअर करा ।

Saturday 12 March 2016

"घे भरारी "


चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌷

गरूडाचा एक  समूह  खाण्याच्या  शोधार्थ  उडत उडत एका  बेटावर  आला  .

ते  बेट  जणू  नंदनवनच होते.
 चहूकडे  खाण्यासाठी  बेडूक ,खेकडे ,मासे, साप,  व  अनेक  समूद्रीजीव होते.

 महत्त्वाचे म्हणजे  आजूबाजूला  त्या  गरूडांवर  हल्ला  करेल  अशा  कोणत्याही  जंगली  श्वापदाचे अस्तित्व  नव्हते.

अगदी  निश्चिंत  मनाने  कशाचीही  भीती  न  बाळगता  ते तेथे  राहू  शकत  होते.

समूहातील  तरूण  गरूड  तर  एकदम  ऊत्साहीत होते.

त्यातील  एक जण  म्हणाला
,"वाह  क्या बात है  !  आता  मी  ईथून कोठेही  जाणार  नाही,  अगदी  बसल्या बसल्या  मेजवानी  आहे  ईथे  ."

ईतर  गरूड  ही  त्याच्या  "हो"  ला  "हो" करत  आनंदात  मशगूल   होते. 

सर्वाचे  छान  आरामात  चालले  असताना  समूहातील  जेष्ठ  गरूड  मात्र  नाराज,व दुखी  होता.

एक  दिवस  त्याने  आपली  चिंता  व्यक्त केली,

"मित्रांनो,  आपण  एक  गरूड  आहोत,  ऊंच  गगन  भरारी घेणे  व अचूकपणे  सावजावर घट्ट  झडप  घालण्यासाठी आपण  ओळखले  जातो.

"" पण  जेव्हा  पासून  आपण  ईथे  आलोय,  गगन  भरारी  सोडाच आपल्या  पैकी  अनेक  जण  साधं  ऊडले सूद्धा  नाहीत  की  पंख  ही  फडफडविलेले  नाहीत.

"आरामदायी  मेजवानी  मूळे  आपण  शिकार  करणेच  विसरून  जाऊ , हे आपल्या  भविष्यासाठी  घातक  आहे. "

"म्हणून  मी हे  बेट  सोडण्याचा  निर्णय  घेत आहे, ज्यांना  माझ्यासोबत  यायचे  आहे  ते  येवू  शकतात. "

त्या  जेष्ठ  गरूडाचे बोलणे  ऐकून सगळे  हसायला  लागले.
कोणी त्याची  गणना  "मूर्खात"  तर  कोणी " वेडा" म्हणून  निर्भत्सना  केली.

बिचार्‍या   एकट्यानेच  ते बेट  सोडून  दूरच्या  जंगलात  जाण्यासाठी  गगन  भरारी  घेतली.

काही  काळ .....  , वर्ष  सरली................  .

तो  गरूड  म्हातारा  झाला .
 त्याला कळाले  की  आपण  फार  दिवसाचे  सोबती नाहीत.
त्याला  मनोमन  आपल्या  साथीदारांची  आठवण  झाली.

  वाटले  चला  एकदा  पाहून  येवू  सार्याना ....आणि  मग  मोठी  भरारी  घेवून  मजल  दरमजल  करत  तो  त्या बेटावर  पोहचला. ..........
....तेथील  दृश्य  फारच  भयानक  होते. ..अकल्पित  होते. .....

बहूतेक  गरूड  मारले  गेले होते. ....
जे  थोडे  वाचले  ते  जखमी  असहाय्य , अगतिकपणे  आर्त  विव्हळत  होते.

" हे काय  झाले  ?  "  जेष्ठ  गरूडाने विचारले

दूखाने विव्हळत  एक  जखमी  गरूड म्हणाला

"आम्हाला  क्षमा करा  !! आम्ही  तूमचा  सल्ला  गंभीरपणे  घेतला  नाही. "

"तूम्ही  गेल्यावर  काही  महीन्यात  या  बेटावर  नाव  घेवुन  काही  माणसे  आली  आणि काही शिकारी  कूत्रे ईथे  सोडून  गेली. "
"सूरूवातीला  कूत्रे  आमच्या  जवळ  आले  नाहीत  पण जेव्हा  त्यांना  समजले  आम्ही  ऊडू ही शकत  नाही  व पंज्याने हल्ला  ही  करू  शकत नाही त्यांनी  आमची  शिकार  करायला  सूरूवात  केली.

जवळपास  सारेच  नष्ट  झालेत..
  जे आमच्या सारखे  राहीलेत  जखमी, अभागी.....  मरणाची  वाट  पहातोय. ..."

  त्या जेष्ठ  गरूडा जवळ  त्यांच्याबद्दल वाईट  वाटण्याखेरीच काहीच  नव्हते ...हळहळत  त्याने   पून्हा  जंगलाकडे  भरारी घेतली.

मित्रांनो  अगदी  असेच  आपल्या  बाबतीतही  घडू  शकते.

जेव्हा  आपण  आपल्या  देणगी  मिळालेल्या  नैसर्गिक  शक्तींचा  ऊपयोग  करत  नाही,   तेव्हा  त्या  गमावून  बसतो.

मग  ती  शक्ती  मनाची  असेल  , मेंदूची  असेल  किंवा  स्नायूंची  असेल  न  वापरल्याने  त्यातील  तेज  ,ओज  कमी  होऊन  निस्तेज  होते.

अशाच  प्रकारे  अंगभूत  असणारी  कौशल्ये, कला  (skill ) यांना  वेळोवेळी  पैलू  पाडले (*polish ) नाहीत  तर  त्याची  क्रियाशक्ती कमी  होते

अतिशय  वेगाने  बदलत  असलेल्या  काळात  आम्ही  आमच्या  नोकरीत  कींवा  करीत  असलेल्या  व्यवसायात  ईतके  सूखासीन ,सूखेनैव, *(comfortable ) असतो  की  मग  कोणताही  नवा बदल  , नवे  ज्ञान,  नवीन  तंत्र , नवे  कौशल्य  आत्मसात  करण्याच्या  भानगडीत  आम्ही  पडत नाही .

आणि  मग  आम्ही  मागे  पडतो  ..........

कधी कधी  बाहेर  फेकले  जातो. .......

आणि  त्याचे खापर  नशीब वर  कींवा  Market Conditions वर  फोडून  रडत  बसतो .

मंडळी .. ..................

HMT घड्याळ,  ............

BUSH  /Crown  TV  ..............

Kelvinetor  Refrigerator ...... .......

Nokia  Handset. .............

HMV  Cassette. .... .....

हे सगळे कशातही गूणवत्तेत कमी नव्हते ........

पण  काळाच्या  जोडीने  बदलले  नाहीत  आणि  मोठी  किंमत  चूकवली ........बाहेर  फेकले गेले. ...

"समय  के  साथ  बदलो , नही तो  समय  आपको  बदल  देगा "
खरच  अस  नको  व्हायला .......

"आपलं ज्ञान, "
 आपल्या  क्षमता, 
आपली  कौशल्ये, 
आपली  तंत्रे  
येणार्या  व बदलत्या  वेळेनुसार  अद्ययावत  करू  या. .....

.त्यांना  धार  आणून  तेजस्वी  करूयात ........
सातत्याने फूकंर मारून  निखार्यावरील  राख  ऊडवून अग्नी  प्रज्वलित  ठेवूया. ...........

यासाठी  "  ना  वयाचे  बंधन  ना  वेळेचे. ..."....

ज्या  साठी  आपण  ओळखले  जात होतो  तीच  ओळख  कायम  ठेवू  या.....  त्या  साठी  प्रयत्नशील  असू  द्या. .

अस  झाल  की  मग  संकटांचा  किंवा  आव्हानांचा  कितीही  मोठा डोंगर  ऊभा  ठाकला  तरी  जिद्दीच्या  पंखांनी  आपण  उंच  उंच  गगन  भरारी नक्कीच  घेवू  शकतो.


             "मंझिल  ऊन्ही को  मिलती  है
            जिनके  सपनो  में  जान  होती है ।
             सिर्फ़  पंखों  से  कूछ  नही  होता
              ऊडान हौसलोंसे  होती  हैं  ।


माझी लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

नम्र विनंती : 
आवडल्यास  हा  ब्लॉग  तूमच्या  किमान  चांगल्या  मित्र/ मैत्रीणी ला  शेअर  करा ।

Friday 4 March 2016

मागे काही राहीलयं का?

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
योगेश जोशी वज्रेश्वरी / ठाणे

        "मागे काही राहीलं तर  नाही  ना   ? "

"अरे  सगळे  सामान  घेतल  का  ?"  "बस  मधे  कोणाच काही  राहील तर  नाही  ना  ?"

"हो .......सर  ,सगळ  घेतल , न  विसरता  !!
सहलीवरून  ऊतरलेली मूल  एकसूरात  ओरडली

"छान , पण  जोशी सर  ,  एकदा  बस  मध्ये  जाऊन  बघता  का   ,"काही मागे राहीलयं  का ते  ? "म्हणजे बस  परत  गेल्यावर  नंतर  धावपळ  नको  !  कस

मूख्याध्यापकांनी सूचना  वजा  विनंती  केली.

"होय  येतो  पाहून,  "
अस  म्हणत  सर  बस  मधे  गेले

एका नजरेत  बस  पाहील्यावर  लक्षात  आलं  सगळ्यांचच  खूप  काही  राहील  आहे  मागे.

वेफर्स ,कूरकूरे,  चाॅकलेट  यांचे  रॅपर्स,  फ्रूटी  , प्लास्टिक  बाॅटल्स.........आता  मात्र  ते  कोणाचच नव्हते  ...

जोपर्यंत  ह्या  भरलेल्या  होत्या  तोपर्यंतच  या  सर्व  " माझ्या " या  सदरात  मोडत  होत्या. .....
आणि  आता  मात्र  कोणाच्याच  नव्हत्या.

.............जमेल  तेव्हढे  एका पिशवीत भरून  सर  खाली  ऊतरले.

"काही  राहील  होत  का  मागे  ?"

या  मूख्याध्यापकांच्या प्रश्नावर   हसत हसत नकारार्थी  मान  हलवत  जमलेल्या  पालकांकडे  गेले.

पण  मन  मात्र  .............

"मागे  काही  राहीलयं  तर  नाही ना  ?"

याच  प्रश्नाभोवती घूटमळत राहीले. ..आयूष्याच्या  प्रत्येक  टप्प्यावर  हा  प्रश्न  निरनिराळ्या  रूपात  समोर  ऊभा ठाकला  ईतके  मोठे  प्रतल या  प्रश्नाचे
 
बालपण  सरताना अनेक  गोष्टी  मागे  राहील्या  काही  खेळ  विकत  घ्यायचे तर  काही  खेळायचे  राहीले. ............

तारूण्याच्या  उंबरठ्यावर  मनापासून  आवडलेल्या व्यक्ती ला अंतरीचे  गूज सांगायचे  राहून  जाते.....

.......व्यवहारी  आयूष्य  पूढेच  सरकत  असल  तरी मन  मात्र  सदैव  मागे  मागे  घूटमळत असत

..आईसोबत  चालणाऱ्या  लहान  बाळा सारखे. .........आई  पूढे  पूढे  जात  असते, पण  तो  रस्तावरील  मांजरीची पिल्ले, रंगीत  काचा,  दगड,  काठ्या  यातच  मागे  मागे  घूटमळत  असतो. ...अगदी  तस्सेच. ....

.                       ● सूचना ●

● पैसे, पाकीट, किल्ली, पास, रूमाल, घेतलात काय?
● लाईट गॅस पंखा नळ बंद केलेत का?
● घाई नको, आपल काही मागे राहीलं तर नाही ना  ?

अशा प्रकारचा  एक बोर्ड  सोसायटीच्या जिन्यात  वाचला.
मनात  सहज  विचार  आला

, "तीन  महीन्याच्या तान्ह्या बाळाला घरात ठेवून कामावर निघालेल्या मातेला हे वाचून काय वाटेल  ?

व्यवहारी जगातील  "सर्व काही " मिळवण्याच्या अट्टाहासापायी काळजातील " सर्व काही "  मागे  ठेवूनच  निघते  ती. ... 
सांगा  कसं  म्हणावं  तिने  "सगळे  घेतलय"  म्हणून. ........

लग्नमंडपात मुली ची पाठवणी  होताना  आईच्या  डोळ्यात  आभाळ  सांडून  ती  रिती  होते.
सगळी  देणी  भागवून  बाप  निवांत  होतो न  होतो  तोच 

एखादी  आत्या  त्याला  म्हणते, "

" दादा हाॅल  सोडायच्या  आधी , एकवार  आत  खोलीत  जाऊन  बघून  ये  बर  ", "काही  मागे राहीलयं का ते?

रिकाम्या  खूर्च्या,  पसरलेल्या  अक्षदा,  ओलांडून  तो  वधूपक्षाच्या  खोलीत  येतो. .......

मूली ने  गौरीहार  पूजला तेथे  आता फक्त फूले  मलूल  पडलेली  दिसतात. ...

.व्याकूळतेने  मनात  म्हणतो  ," सगळच  तर  मागे  राहीलयं." ....... ...

पंचवीस  वर्षे  जे  "नाव " घेवून  ....
...त्या " नावाने " हाका  मारत  तिच्या  मागे  मागे  पळत  होता  , 
ते  तिचे  'नावही '  व  तिच्या " नावापुढे"  ज्या  अभिमानाने   लावत  असलेले  "त्याचे " नावही   

हातावर ऊदक  सोडताच क्षणार्धात  तिथेच  त्या अक्षतापूष्पा  सोबत " निर्माल्य " झालेले  दिसल्याने  एकटाच मनातल्या मनात  भरभरून  कोसळतो. ...........

"अरे  आलास  का पाहून  ? "
आपल  मागे  काही  राहीलं तर नाही ना  ?

............या  प्रश्नाचे मौन  हेच  ऊत्तर  असते.........   निशब्द ......कारण  जे  राहीलं  ते  आता  परत  येणार  नव्हते. .....

                          ●●●

"आपल  काही  मागे राहीलं तर नाही ना  ? "

स्मशानातून  बाहेर  पडताना  भटजींनी  त्याला  विचारले.

"नाही "   अस  सांगताच  ते  पूढे निघून  गेले.

त्याला  मात्र  मागे  पहाताना  दिसली  आईची  धडाडणारी चिता. ..........

...."नाही  कस  ? सगळच तर  राहीलयं  मागे. "

आणि  तो  आवेगाने  मागे  फिरला,  सरणार जवळ   पडलेली  चिमूटभर  राख  त्याने  हातात  घेतली. ...

त्याला  मागे  फिरलेला पाहून  एका ने विचारले
, "
काही राहीलं होत का मागे  ? "

भरल्या  डोळ्यांनी  तो  म्हणाला

" नाही,  काही ,-काही  राहील  नाही  मागे  "

"आणि  जे  राहीलं  आहे  ते  आता  कधी. . कधीच  परत येणार नाही ".......काही  उरलच नाही  , सोबत  घेण्यासारखे...........

.....