चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
" राजगृहातील वनवास "
"बाबा रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नी चे नाव काय हो ?"
माझ्या मूलगी ऋचा च्या या प्रश्नाने मी गोंधळून गेलो .
"अग ते आपलं.....
, हे ....काय ....
...ते म्हणजे". ........
.अग .. ...तोंडावर आहे........
पण. .येत. .. नाही ...
"आपल ...हे..."......." ते ......".
आणि मला लक्षात आलं.....
की हे आपल्याला " आठवत " नाही किंवा कधी "लक्षातच ठेवलेले नाही, जाणीवपूर्वक!
राम -सीतेसह चौदा वर्षे वनवासात सावली बनून राहणारा सावत्र भाऊ "लक्ष्मण " हा " आदर्श बंधू, " "आदर्श दीर " , व स्वतःच्या पत्नी ला चौदा वर्षे राजगृही वनवासाहूनही खडतर अशा पतीवियोगात सोडणारा म्हणून "वैराग्याचा पूतळा " म्हणून गौरवला जातो. ..
...
पण त्याच वेळी कोणतीही चूक नसताना चौदा वर्षे पतीवियोगात राजगृही वनवासात भोगणाऱ्या त्याच्या पत्नीची दखल महर्षी वाल्मिकी नी घेवू नये. ...
तिच्या व्याकूळ मनोअवस्थेचे , संतापाची योग्य ती दखल.......योग्य ते वर्णन ही करू नये .......
चौदा वर्षे पत्नी पासून दूर राहून जर लक्ष्मण वैराग्याची मूर्ती, आदर्श बंधू. ...आणि राम -सीतेसह देवत्व प्राप्त करत असेल. .तर
त्याच्या पत्नी ला "त्यागाची मूर्ती," "वैराग्य शिरोमणी ,"वंदनीय, " पूजनीय "म्हणुन का मान्यता मिळू नये. ..........का बरं तिचे साध " नाव " सूद्धा आम्हाला पटकन आठवू नये. ..
प्रकाश देणार्या समईचे कौतुक होते पण स्वतः ला जाळून घेणारी वात खिजगणतीतही नसते........
आपल्या अवती भोवती कदाचित अशा वाती असू शकतील .......
आई. .पत्नी. .बहीण. ..वहीनी. ..अनेक रूपात. ......
वाल्मिकी नी केलेली चूक आपण का करायची ?
त्या जळणार्या वातीला फक्त ईतकच म्हणून बघा
" कीती करतेस गं तू ?
"थकत कशी नाहीस ?
"लक्षच देता नाही आले तूझ्याकडे !"
मी खात्रीने सांगतो असं म्हटल्यावर
त्या राजगृही वनवासाहूनही खडतर अशा दूःखात कूढणार्या ""ऊर्मिले"" चे डोळे पाण्याने भरून येतील व सारा वनवास सूफल संपूर्ण होईल. .
मग म्हणणार ना आजच !
🙏चिंतनिका जीवन एक " संघर्ष "
योगेश जोशी
9967766451
वज्रेश्वरी / ठाणे
आवडल्यास शेअर करा ।
अगदी वास्तव लेखन ..अप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद ज्योती
Deleteअगदी वास्तव लेखन ..अप्रतिम
ReplyDeleteVery true
ReplyDeleteVery true
ReplyDelete👍👌
ReplyDelete👍👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete