चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌷
गरूडाचा एक समूह खाण्याच्या शोधार्थ उडत उडत एका बेटावर आला .
ते बेट जणू नंदनवनच होते.
चहूकडे खाण्यासाठी बेडूक ,खेकडे ,मासे, साप, व अनेक समूद्रीजीव होते.
चहूकडे खाण्यासाठी बेडूक ,खेकडे ,मासे, साप, व अनेक समूद्रीजीव होते.
महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला त्या गरूडांवर हल्ला करेल अशा कोणत्याही जंगली श्वापदाचे अस्तित्व नव्हते.
अगदी निश्चिंत मनाने कशाचीही भीती न बाळगता ते तेथे राहू शकत होते.
अगदी निश्चिंत मनाने कशाचीही भीती न बाळगता ते तेथे राहू शकत होते.
समूहातील तरूण गरूड तर एकदम ऊत्साहीत होते.
त्यातील एक जण म्हणाला
,"वाह क्या बात है ! आता मी ईथून कोठेही जाणार नाही, अगदी बसल्या बसल्या मेजवानी आहे ईथे ."
त्यातील एक जण म्हणाला
,"वाह क्या बात है ! आता मी ईथून कोठेही जाणार नाही, अगदी बसल्या बसल्या मेजवानी आहे ईथे ."
ईतर गरूड ही त्याच्या "हो" ला "हो" करत आनंदात मशगूल होते.
सर्वाचे छान आरामात चालले असताना समूहातील जेष्ठ गरूड मात्र नाराज,व दुखी होता.
एक दिवस त्याने आपली चिंता व्यक्त केली,
"मित्रांनो, आपण एक गरूड आहोत, ऊंच गगन भरारी घेणे व अचूकपणे सावजावर घट्ट झडप घालण्यासाठी आपण ओळखले जातो.
"" पण जेव्हा पासून आपण ईथे आलोय, गगन भरारी सोडाच आपल्या पैकी अनेक जण साधं ऊडले सूद्धा नाहीत की पंख ही फडफडविलेले नाहीत.
"आरामदायी मेजवानी मूळे आपण शिकार करणेच विसरून जाऊ , हे आपल्या भविष्यासाठी घातक आहे. "
"म्हणून मी हे बेट सोडण्याचा निर्णय घेत आहे, ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे ते येवू शकतात. "
त्या जेष्ठ गरूडाचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले.
कोणी त्याची गणना "मूर्खात" तर कोणी " वेडा" म्हणून निर्भत्सना केली.
कोणी त्याची गणना "मूर्खात" तर कोणी " वेडा" म्हणून निर्भत्सना केली.
बिचार्या एकट्यानेच ते बेट सोडून दूरच्या जंगलात जाण्यासाठी गगन भरारी घेतली.
काही काळ ..... , वर्ष सरली................ .
तो गरूड म्हातारा झाला .
त्याला कळाले की आपण फार दिवसाचे सोबती नाहीत.
त्याला मनोमन आपल्या साथीदारांची आठवण झाली.
वाटले चला एकदा पाहून येवू सार्याना ....आणि मग मोठी भरारी घेवून मजल दरमजल करत तो त्या बेटावर पोहचला. ..........
....तेथील दृश्य फारच भयानक होते. ..अकल्पित होते. .....
बहूतेक गरूड मारले गेले होते. ....
जे थोडे वाचले ते जखमी असहाय्य , अगतिकपणे आर्त विव्हळत होते.
जे थोडे वाचले ते जखमी असहाय्य , अगतिकपणे आर्त विव्हळत होते.
" हे काय झाले ? " जेष्ठ गरूडाने विचारले
दूखाने विव्हळत एक जखमी गरूड म्हणाला
"आम्हाला क्षमा करा !! आम्ही तूमचा सल्ला गंभीरपणे घेतला नाही. "
"तूम्ही गेल्यावर काही महीन्यात या बेटावर नाव घेवुन काही माणसे आली आणि काही शिकारी कूत्रे ईथे सोडून गेली. "
"सूरूवातीला कूत्रे आमच्या जवळ आले नाहीत पण जेव्हा त्यांना समजले आम्ही ऊडू ही शकत नाही व पंज्याने हल्ला ही करू शकत नाही त्यांनी आमची शिकार करायला सूरूवात केली.
जवळपास सारेच नष्ट झालेत..
जे आमच्या सारखे राहीलेत जखमी, अभागी..... मरणाची वाट पहातोय. ..."
जे आमच्या सारखे राहीलेत जखमी, अभागी..... मरणाची वाट पहातोय. ..."
त्या जेष्ठ गरूडा जवळ त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याखेरीच काहीच नव्हते ...हळहळत त्याने पून्हा जंगलाकडे भरारी घेतली.
मित्रांनो अगदी असेच आपल्या बाबतीतही घडू शकते.
जेव्हा आपण आपल्या देणगी मिळालेल्या नैसर्गिक शक्तींचा ऊपयोग करत नाही, तेव्हा त्या गमावून बसतो.
मग ती शक्ती मनाची असेल , मेंदूची असेल किंवा स्नायूंची असेल न वापरल्याने त्यातील तेज ,ओज कमी होऊन निस्तेज होते.
अशाच प्रकारे अंगभूत असणारी कौशल्ये, कला (skill ) यांना वेळोवेळी पैलू पाडले (*polish ) नाहीत तर त्याची क्रियाशक्ती कमी होते
अतिशय वेगाने बदलत असलेल्या काळात आम्ही आमच्या नोकरीत कींवा करीत असलेल्या व्यवसायात ईतके सूखासीन ,सूखेनैव, *(comfortable ) असतो की मग कोणताही नवा बदल , नवे ज्ञान, नवीन तंत्र , नवे कौशल्य आत्मसात करण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही .
आणि मग आम्ही मागे पडतो ..........
कधी कधी बाहेर फेकले जातो. .......
आणि त्याचे खापर नशीब वर कींवा Market Conditions वर फोडून रडत बसतो .
मंडळी .. ..................
HMT घड्याळ, ............
BUSH /Crown TV ..............
Kelvinetor Refrigerator ...... .......
Nokia Handset. .............
HMV Cassette. .... .....
हे सगळे कशातही गूणवत्तेत कमी नव्हते ........
पण काळाच्या जोडीने बदलले नाहीत आणि मोठी किंमत चूकवली ........बाहेर फेकले गेले. ...
"समय के साथ बदलो , नही तो समय आपको बदल देगा "
खरच अस नको व्हायला .......
"आपलं ज्ञान, "
आपल्या क्षमता,
आपली कौशल्ये,
आपली तंत्रे
येणार्या व बदलत्या वेळेनुसार अद्ययावत करू या. .....
.त्यांना धार आणून तेजस्वी करूयात ........
.
.
सातत्याने फूकंर मारून निखार्यावरील राख ऊडवून अग्नी प्रज्वलित ठेवूया. ...........
यासाठी " ना वयाचे बंधन ना वेळेचे. ..."....
ज्या साठी आपण ओळखले जात होतो तीच ओळख कायम ठेवू या..... त्या साठी प्रयत्नशील असू द्या. .
अस झाल की मग संकटांचा किंवा आव्हानांचा कितीही मोठा डोंगर ऊभा ठाकला तरी जिद्दीच्या पंखांनी आपण उंच उंच गगन भरारी नक्कीच घेवू शकतो.
"मंझिल ऊन्ही को मिलती है
जिनके सपनो में जान होती है ।
सिर्फ़ पंखों से कूछ नही होता
ऊडान हौसलोंसे होती हैं ।
जिनके सपनो में जान होती है ।
सिर्फ़ पंखों से कूछ नही होता
ऊडान हौसलोंसे होती हैं ।
माझी लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे
नम्र विनंती :
आवडल्यास हा ब्लॉग तूमच्या किमान चांगल्या मित्र/ मैत्रीणी ला शेअर करा ।
खुप छान योगेश जी
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteNice sir
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteNice sir
ReplyDeleteGood thoughts.
ReplyDeleteKeep it up.
Good thoughts.
ReplyDeleteKeep it up.
Very nice thought sir
Deleteखूप छान लेख आहे.
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteVery nice story.
ReplyDeleteMotivational
Very motivational story
ReplyDeleteGreat thought sir
ReplyDeleteखूपच सुंदर लेख सर...
ReplyDeleteआपली लेखणी आणि वाणी खरंच खूप प्रेरणादायी आहे...