माझी लेखनयात्रा
Friday, 16 May 2025
गिरनार दत्तात्रेय पादुका दर्शन...आदेश ,आनंद , अनुभव आणि अनुभूती..*
Friday, 21 October 2016
भारत कधी कधीच माझा देश आहे
माझी लेखनयात्रा
. *जीवन एक संघर्ष*
* *वाचा विचार करा पण थांबू नका* *
सध्या चर्चा सूरू आहे ती पाकिस्तानी सिनेकलावंताचा सहभाग असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शन विषयी ,
त्यासाठी सरकारी संरक्षणाविषयी,
बघावा की बघू नये या विषयी.
बाॅलिवूडचा कळवळा असणारे व स्वताला ऊच्चविद्याविभूषित म्हणवणारे नतद्रष्ट असे म्हणतात की कला ही कला असते तिला धर्म , प्रांत या बंधनात अडकवता कामा नये.
दोन देशातील वैर खेळाडू तसेच कलाकारांमध्ये कशाला ???
कलेशी ,कलाकारांशी आपले वैर कशाला. ....??? वैगरे .वैगरे
*हे सगळं ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते*
मग दोन देशांतील वैर नेमके असत कोणात हो ?
त्या सीमेवर हाड गोठवणार्या थंडीत कूडकूडणार्रा सैनिकांमध्ये
असते की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूर्गम भागात छातीचा कोट करून ऊभ्या असलेल्या जवानांमध्ये असते
की घरदार मूलंबाळ, संसार , लांब सोडून जीवावर उदार होऊन सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालत पहारा देणार्या सैनिकांमध्ये असते का वैर ?
*त्या पाकिस्तानी सैनिकाबरोबर कशाला भारतीय जवानाने वैर घ्यायचे ? त्यानी ऐकमेकांचे वैयक्तिक अस काय वाईट केल आहे ?
अरे अकलेच्या खंदकांनो आमचा सैनिक त्याच्या रक्ताने माझ्या देशाच्या सीमा आखतो म्हणूनच तूमच्या सारखे कृतघ्न कलाकार उघडे नागडे नाचून कोट्यधीश होऊ शकतात ... बेताल बोलू शकतात....
ईथलेच खाऊन ईथेच गरळ ओकू शकतात ... .
पण बाॅलिवूड सम्राटांनो हा दोष तूमचा नाही आम्हीच षंढ झालो आहोत
आमची देशभक्ती फक्तं 15 ऑगस्ट ला तिरंग्याचा डीपी आणि ऊरी सारख्या हल्यानंतर "भावपूर्ण श्रध्दांजलि "अमर रहे "किंवा आंख मे भर लो पानी या रिंगटोन मर्यादेपूरती दिखावू बेगडी असते .
*कारण कधी कधीच भारत माझा देश असतो* .
👉पण आता मात्र या वेळी हा समज खोटा ठरवायचा आहे
🇧🇴बांधवांनो ऊरीतील शहीदांचा बदला तर आपल्या सैनिकांनी घेतला आहे
आता आपली म्हणजे सामान्य भारतीय🇧🇴 नागरिकाची वेळ आली आहे बदला घ्यायची
आपल्या कृतीतून दाखवून देवू आपल्या सैनिकांना तूम्ही एकटेच लढत नाहीत तर आम्हीही आहोत सोबतीला .🇧🇴
ईतका कडक बहीष्कार घालूया यांच्या चित्रपटावर की डोयरकीपर पण म्हणायला हवेत की नोकरी गेली तरी चालेल पण मी सूद्धा चित्रपटगृहात आत जाणार नाही
हीच खर्या अर्थाने ऊरीतील हूतात्मा जवानांना सूजाण सूज्ञ व कर्तव्यदक्ष नागरीकांकडून खरी श्रद्धांजली ठरेल 💐
आणि तरीही कोणी जर चित्रपट पहायला गेला तर तो ** *** ** ***
संस्कार व पेशा या मूळे मला फूल्या फूल्या लिहायला भाग पडते आहे
पण सूज्ञ वाचक त्या अचूक भरतील ही खात्री
जय हिंद 🇧🇴
वंदे मातरम
योगेश जोशी
वज्रेश्वरी /ठाणे
*टिप* :कृपया जास्तीत जास्त शेअर करा.. नावाशिवाय शेअर केल तरीही चालेल देशभक्तीला काॅपीराइट नाही
कोणी हिंदीत अनूवाद केला तरी चालेल जास्तीत जास्त जणांपर्यत शेअर करा
आणि हो कोणत्याही गरीब कलाकार किंवा तंत्रज्ञ यांचे पैसे या चित्रपटात अडकलेले नाहीत
आता फक्त आपल्या भारतीयांच्या जीवावर मोठे झालेल्या चार दोन गर्विष्ठ धनाढ्यांचा नफा अडकलेला आहे
Saturday, 25 June 2016
तूम्ही कोण ??? कूंभार,शिल्पकार, की माळी
Iचिंतनिका जीवन एक " संघर्ष "
तूम्ही कोण ?? कूंभार, शिल्पकार, की माळी !!
शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि पून्हा शाळा शिक्षण प्रक्रिया हे शब्द ऐकू येवू लागले . शाळेत जाऊन शिकणे.. किंवा शाळेत शिकवले जाणे .. वा मी शिकवतो. ...अस ऐकल की शिक्षण , शिकणे, शिकवणे ही नक्की काय प्रक्रिया आहे ? हे कोड पडत.
मूल शिकत कस ?
त्याला शिकवलं जात म्हणजे नेमक काय ?
हे प्रश्न ऊभे ठाकतात.
एक सर्वमूखी असलेली समजूत म्हणजे " लहान मूल म्हणजे ओला मातीचा गोळा , जसा आकार द्याल तसे घडेल. "
या ठीकाणी शिक्षक /पालक हा कूंभाराच्या भूमिकेत दिसतो .
तर शिक्षक हा शिल्पकार असतो असही म्हटल जात. दगडात मूर्ती असतेच शिल्पकार फक्तं त्याला नको असलेला भाग छिन्नीने काढून टाकतो व हवे असलेले शिल्प बाहेर येते.
असे निरनिराळे सिध्दांत ऐकले की गोंधळ होतो समाधान होत नाही.
खरच शिक्षक /पालक हा कूंभार किंवा शिल्पकार असू शकतो. नक्कीच तस नसावं. कारण चैतन्याने भरलेले मूल म्हणजे एकसारखी माती वा निर्जीव पाषाण थोडेच आहेत ???
तस असत तर कूंभार / शिल्पकाराप्रमाणे आपल्याला हवी तशी साचेबद्ध मूल घडवू शकलो असतो आणि तशी घडलीही असती .
क्रिडागूरू रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकर सारखी अनेक शिल्प /मडकी तयार केली असती .
याप्रमाणे अनेक अब्दुल कलाम , अनेक लता,अनेक न्यूटन ,अनेक होमी भाभा अशी फक्तं आणि फक्तं हिमालयाची अनेक शिखरचं तयार करता आली असती.
कोणतेही पोषक वातावरण , क्रिडा पाश्वभूमी नसतानाही " सूनिल " विक्रमादित्य सूनिल गावस्कर होतो परंतू जन्मापासून सर्व पंचतारांकित सोयी ,सूविधा ,कोचिंग, मार्गदर्शन ऊपलब्ध असतानाही "रोहन " त्या क्षेत्रात " रोहन गावसकर " बनू शकला नाही.
आणि मग शिकणं- शिकवणं म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याची ऊत्सूकता वाढते .
अशावेळी वीस वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवला. आमच्या वज्रेश्वरी गावातील मारूती मंदिरात एक ऐंशी -पंच्याऐंशी वर्षाचे ऋषितुल्य संन्यासी व्यक्तीमत्व रहात होते. मराठी, इंग्रजी व संस्कृत वर ऊत्तम प्रभुत्व असलेले व वेदशास्त्र पारंगत आणि दिव्य स्मरणशक्ती असलेले पूरूष, वेदमूर्ती विठ्ठलपंत कूलकर्णी (बाबा ) या नावाने सर्वाना गूरूस्थानी होते.
मंदिरात त्यांनी मला विचारले "योगेश काय चाललय सध्या ?"
"शिक्षक म्हणुन रूजू झालोय. .मूलांना शिकतोय. ..मी ऊत्तरलो
पांढर्या शूभ्र लांब दाढीवरून हात फिरवत हसत हसत बाबा म्हणाले , "तू शिकवत नाही रे त्यांना , फक्तं शिकायला मदत करतोस. "
माझ्या कपाळावरील प्रश्नचिन्ह पाहून बाबांनी मला ऊदाहरणादाखल" शांतिमंत्र " अर्थासहित स्पष्ट केला.
यजुर्वेदाच्या शेवटचा अध्याय महत्वाचे उपनिषद
" ईशावास्योपनिषधाचा " आहे . या उपनिषेदाचा प्रारंभ व शेवट याच शांतिमंत्राने झाली आहे.
. ॐ पूर्णमदः पूर्ण मिदं
पूर्णात पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णवेवावशिष्यते ।
ॐ शांति : शांति :शांति : ॐ
याचा अर्थ
ब्रह्म पूर्ण आहे , ते पूर्ण आहे
हे पूर्ण आहे , पूर्णातून पूर्ण निष्पन्न होते,
पूर्णातून पूर्ण काढून घेतले वजा केले तरी
पूर्णच बाकी राहते.
या विश्वातील , ब्रह्मांडातील प्रत्येक जीव जंतू पूर्ण आहे. किती मोठा व गहन अर्थ सांगितला आहे यात.
अहो एखाद लहानसं " बी " च उदाहरण घ्या.
' बी"लहानसं जरी असल तरी ते अपूर्ण असतं का हो?
नक्कीच नाही....
तर त्यात संपूर्ण झाडाचे गूण संपृक्तपणे ठासून भरलेले असतात. एवढ्याशा " बी " मध्ये संपूर्ण मोठे झाड लपलेले असते. फक्त ते झाडाचे सारे गूण प्रकट होण्यासाठी कुशल माळी किंवा शेतकरी मदत करत असतो ईतकचं !
कवी विल्यम्स वर्डसवर्थ म्हणतो "Child is father of man ."
लहान अर्भकातच संपूर्ण माणूस दडलेला असतो .आणि ईथे आम्हा आईबापाला अहंकार होतो 'आम्ही मूलाला वाढवले शिक्षकांना वाटत ' आम्हीच शिकवले शहाणे केले !'
'अरे आपण काय वाढवणार व शिकवणार !'
त्याची भविष्यातील वाढ, शहाणपणा जन्मजात त्याच्यात संपृक्त करून ठेवलेला असतो. आपण फक्त मददगार व्हायचे.
बी ऊत्तम रूजून परिपूर्ण झाड होण्यासाठी आवश्यक माती ,पाणी, हवा पूरवणारा कूशल माळी व्हायचे !!
माळी कितीही हूशार , कूशल असला तरी तो आंब्याच्या झाडाला अंजीर नाही उगवू शकणार . पण त्या आम्रवृक्षाची ऊत्तम निकोप वाढ होऊन त्याला दर्जेदार आम्रबहर कसा येईल ! ही व्यवस्था मात्र नक्कीच करू शकतो !!
रसायन शास्त्राच्या भाषेत सांगायचं तर आपण ऊत्पेरक ( Catalyst ) भूमिकेत असावं .
आणि एकदा का हे समजल की मग लाखो रूपये घेवून मेडीकल entrance, NEET, CET, JEE आय.आय.टी यन्स जन्माला घालू असे सांगणारी कोचिंगच्या दूकानदारीला थोडा बहूत तरी पायबंद बसेल. ...
मग कोण होताय तूम्ही ?? कूंभार, शिल्पकार की माळी
Choice is yours, will change the future
माझी लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे
संपर्क 9967766451
What's App वर प्रतिसाद जरूर कळवा
टिप ::वरील मते व्यक्तिगत असून मतमतांतरे असू शकतात त्या सर्वांचे स्वागत व आदर राखून
Monday, 30 May 2016
काय भूललासी वरलीया रंगा
काल परवा अचानक पणे what's app वर एक विनोद वाचनात आला......नंतर अनेक ग्रूपवर आला म्हणजे viral झाला होता .
भाऊ कदम मूलगी पहायला जातो मूलगी काळी असते तर मूली चा बाप कार द्यायला तयार होतो
त्यावर मूलगा म्हणतो तूमच ठीक आहे पण आमच्या पूढील पिढीत मूलगी खपवायला आम्हाला हेलिकॉप्टर द्यावे लागेल त्याचे काय ?
साधारण अशा आशयाचा हा विनोद..
खर तर विनोद हा विनोद म्हणूनच घ्यावा हे माहीती असूनही माझ्या सारख्या विनोदी माणसालाही यावर हसू आले नाही .
कूठेतरी हा विनोद मन विषण्ण करून गेला.
गोरा ईंग्रज जाऊन काही तप गेली तरी गोर्या रंगाची गूलामी मात्र आमच्या मानगुटीवरून काही केल्या ऊतरायला तयार नाही.
गोरेपणाची गूलामगिरी कूठेतरी खोलवर घट्ट रूजली गेली ।
याची सूरूवातच जन्माअगोदर पासून सूरू होते.
अमूक तमूक खा ग बाई ... दूध केशर घे ...बाळ कस गोरगोमट होईल हं. ...
खरं तर मूलगाच हवा..... पण मूलगी झाली तर मात्र सूंदर गोरीपानच हवी हो !
पाळण्यात असताना कमेंट आल्या " व्वा !! काय छान गोरीपान आहे हो मूलगी. """..
बालपणी गाणं कानावर आले गोरी गोरी पान फूलासारखी छान दादा मला एक वहीनी आण. ..
तारूण्यात कानावर शब्द आले चांदी जैसा रंग है तेरा ....सोने जैसे बाल......
मी गोरी आहे म्हणजे नक्की काय आहे ???
याच ऊत्तर मोठी होत गेले आणि कळत गेल ...
समजायला लागली मला माझ्या गोरेपणाची किंमत...
रंग देहावरून फिरणाऱ्या ऊत्सूक नजरा. ..
सलगीसाठी धडपडणाऱ्या.....
प्रेमात पडणारी, ......मागे लागणारी पोरं....
घरचे,
बाहेरचे,
नातलग,
शिक्षक
सगळ्यांच्याच नजरेत ' माझ्या ' आधी दिसणारा माझा 'गोरेपणा'
सगळ्यात आधी अधोरेखित होणारा
मी गोरी आहे म्हणजे काय आहे?
मैत्रिणी म्हणतात,
"तुला नाही कळणार काळेपणाची दुःखं !!!!
"टीव्हीवर दिसणाऱ्या गोऱ्या रंगासाठी होणार्या हजारो कोटींच्या ऊलाढालीच्या बाजाराला.....क्रीम ऊपाय जाहीरातीःना ठेवू नकोस नावं.....
दररोज नवीन अॅडव्हान्स फार्मूला सह काही दिवसापासून ते आठवड्यात गोरेपणाची हमी देणारी हमखास ऊत्पादने....
आमच्यासाठी वेड्या आशेचा किरण असतात ग. . ......त्यात घरगुती नूस्के ...नो साईड ईफेक्ट वाला आयूर्वेद ही मागे कसा राहील ...
गोरेपणाला कधीच नसत दूःख.....
नसतो कसला त्रास ...
या ऊलट
"अग लग्नाच्या बाजारात सगल्यात जास्त तूझाच भाव..""
खरच .....
मी गोरी आहे म्हणजे काय ?????
माझ्या रक्ता मांसावर चढलेली एक त्वचा.....
फक्त त्वचा ....
आई बाबां कडून वाहून आलेले जीन्स.....
या उपर माझं कर्तृत्व काय ?......
शून्य. ..
पण तसही ते कतृत्व बघायचे आहे कुणाला ???
माझी कातडीच सगळ सांगते....
का ???
ईतर रंगाच्या त्वचेखाली... भावना , प्रेम , ओढ , काम भावना' शृंगार. .. गूणवत्ता, कर्तृत्व काही नसेल.??. की कमी असेल. ..??.
पण याचा विचार कोणाला करायचाय. ..
मग मी गोरी आहे म्हणजे नेमकं काय आहे??
कुणास ठाऊक??
मी नक्की कोण आहे?
गोरी बाई,
काळी बाई,
सावळी बाई
की नुसती बाई
हो हो नूसती बाई ....
माणुस नाही ...आधी बाई...
माझ्या कातडीच्या रंगा वरुन...
त्यांना,
ह्यांना,
ह्याला,
त्याला
सगळ्यांनाच्
काहीतरी म्हणायच असत ...सतत..
तू गोरी ना म्हणून...
तू काळी ना म्हणून...
तू सावळी ना म्हणून...
मग होते हळूहळू सवय या 'म्हणून' ची
आणि तिला ही चढतो कैफ तिच्या रंगाचा
केव्हा मग होते ती दुःखी तिच्याच रंगामुळे..
कोणी विचारतं का तुझा बाप, भाऊ, नवरा, मित्र, प्रियकर
यांच्या कातडीचा रंग कसा आहे...
छे ! ! छे ! ! काहीतरीच काय ?
आजिबात अस काही विचारायचं नसतं...
कारण या मातीसाठी
पुरुष कर्तृत्व असतो आणि स्त्री फक्त भोग...
काळा फळा ..........हवा
काळा पैसा. ..........हवा
काळी माती........... हवी
काळे ढग ............. हवेत
काळी तिट............. हवी
काळे डोळे ............ हवे
काळा विठ्ठल ...... हवा
काळा कृष्ण .........हवा
पण ...........
पण ........पण
राधा मात्र गोरीच हवी ........
तेच तिचे कर्तृत्व. .......
तीच गूणवत्ता. ........
किती करकचुन बांधून टाकले आहे
आपण आपल्यालाच...
मग सौंदर्य दिसत नाही....
आनंद दिसत नाही, ...
कर्तृत्व दिसत नाही....
दिसतो फक्त रंग.....
काळा...सावळा...
नाहीतर गोराही !!
शिवाय नोकारीतही म्हणे तुम्हाला
मिळते विशेष वागणूक..
तुला हवीये की नकोय हा मुद्दाच नाहिये...
पुरुषांना ही हव्या असतात गोर्या बायका
का तर वंश पुढे निघेल गोरा !!
खरच जर फक्तं गोरेपणात सौंदर्य असत तर प्राचीन मंदिरावरील कमनीय सौदर्यवतींची शिल्पे फक्त संगमरवरी दगडात असती पण ती कोरली गेली काळ्याशार गंडकी पाषाणात. ..आजही मन मोहीत करतात. ....
मग जिवंतपणी ही फक्त गोरेपणाची अपेक्षा व सावळयाची उपेक्षा ही कसली मानसिक गूलामगिरी की विकृती. ...
आफ्रिकन आमच्या ईथे येतो तेव्हा तो निग्रो असतो या ऊलट एखादा भिकार गोर्या कातडीचा जरी आला तर तो परदेशी नागरीक (foreiner ) ठरतो ही कोणती बौद्धिक दिवाळखोरी .
आणि संत चोखामेळा सहज आमचे कान टोचून जातात
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||
नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||
चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||
संदर्भ
डोंगा - वेडा वाकडा / वळणदार
कमान - धन्यूष्य
तीर - बाण
🌈माझी लेखनयात्रा
Saturday, 2 April 2016
"एका शेवटाची सुरूवात "
चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
मूलींचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून परत येताना रस्त्यात आंब्याचे झाड दिसले.
" बाबा कैरी हवी " या बालहट्टात सामील होऊन दगड भिरकावून कैर्या पाडल्या व "वज्रेश्वरी" गावातील माझ्या खोडकर दिवसांची आठवण झाली.
"बाबा ह्या झाडाला आपण कधी पाणी दिले नाही की याची निगा घेतली नाही की काळजी घेतली नाही; या ऊलट दगड मारून दूखवलेच त्याला; तरीही त्याने न रागावता आपल्याला कैर्या दिल्या."
"मग ज्या ' मनूष्यप्राण्याने ' आपल्या मूलाबाळांवर प्रेम केले त्यांच्या साठी "आयूष्य "वेचले त्यांच्या वाट्याला 'वृद्धाश्रम' का हो ? "
तिच्या प्रश्नातच मला ऊत्तर दिसले. "मनूष्य" फार कमी काळ "मनूष्या"सारखा वागतो, आणि जास्त वेळ " प्राण्या"सारखाच असतो ! पंखात व पंजात बळ येण्या पूरतीच प्राण्यांमधे कुटुंब व्यवस्था असते. म्हणूनच "मनूष्यप्राणी" हेच संबोधन सूचक होते .
"बस झालं रे परमेश्वरा, ने आता !"
"नाही सोसवत रे आता !! बोलव रे, लवकर !!"
अशा अर्थाची वाक्य दिवसात कोणाच्या ना कोणाच्या तोंडून आपल्या कानी पडतात. तरीही हा क्षणिक वैताग, त्रास, बाजूला ठेवून प्रत्येक जण जगत असतो. ....तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टी जगण्यास प्रवृत्त करतात. ? ? ?
कर्तव्य, जबाबदारी, स्वप्न, नातीगोती, कुटुंब, प्रेम या प्रयोजनांचे स्वरूप आयूष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जाते.
पण आयूष्याच्या संध्याकाळी तीव्र जीवनेच्छेचे ठोस कारण नसले तर ही संध्याकाळ फारच तप्त होते , जीवाची काहीली करते .
आपण निरूपयोगी ; कुटुंबावर भार ; घरात अडचण म्हणून तर राहणार नाही ना ???
हा विचार अस्वस्थ करतो.
"गात्र" शिथिल होत जातात अन "त्रागा" वाढत जातो .
'आम'च्या वेळी असं नव्हतं !!
'आम'च्या ईथे नव्हते हो चालत असलं !
'आम'च्या कुटुंबात नाही हो ह्या पद्धती !
'आम'च्यात नाही असे काही !!
हा " आमवात " बळावत जातो व जनरेशन गॅप ची " रूजवात " होते.
तारूण्याच्या ऐन उमेदीत ज्या स्वप्नांच्या मागे जीवाचे रान केले, करियर च्या मागे बेदरकारपणे बेफाम होऊन धावताना प्रसंगी मूल्यसंस्कार तूडवले गेले त्या स्वप्नांचे मोल आता कवडीमोल झालेले पाहून आता विषाद, खेद, खंत ,उपेक्षा याखेरीज हाती काही लागत नाही.
नको नको म्हणत टाळताना नकळतपणे समोर ऊभा ठाकलेला " वानप्रस्थाश्रम " मानसिक, भावनिक, शारीरिक, व आर्थिक रिकामपण घेवून येतो.
कर्तव्य , लोकलज्जा, प्रापर्टी किंवा प्रेमापोटी काही जण जेष्ठांची जबाबदारी घेतातही पण ती जबाबदारी नूसतीच घेवून चालत नाही ती निभावणं ही गरजेचे असते.
कृपया जेष्ठांच्या मदतीची याचना करण्याची वाट पाहू नका , त्यात त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होईल. ....न मागता........हात न पसरताही त्यांचा हात हाती घ्या. पैशाची नव्हे तर सहवासाची , सहप्रवासाची मदत करा. ऊत्तम श्रोता व्हा ! ! त्यांना बोलण्याची संधी द्या. जगण्यात जीवन येईल त्यांच्या.
हे करत असताना एक महत्त्वाची गोष्ट करा ते म्हणजे आज तूम्हाला वयोवृद्धा कडून जी अपेक्षा आहे, त्यांच्या ज्या गोष्टीचा त्रास होतोस ,ज्या गोष्टीची अडचण होतेय अस वाटत. ..ती मात्र लक्षात ठेवा. ......कारण तूम्हीही वानप्रस्थाश्रमात
जाणार आहात निदान पूढील गृहस्थाश्रमींना तरी फायदा होऊल त्याचा .
कारण अंतिम आनंदयात्रेनंतर जर ,"बर झालं सूटले एकदाचे, "हे हळहळणारे शब्द जगलेल्या आयूष्याचा पराभव करतात.
"काय हे बाबा, किती कठीण लिहिले आहे , मला कळेल असे सोपे सांगा ना जरा "
माझ्या सातवीत असणार्या ऋचा ची तक्रार वजा सूचना.
ठीक तर एक गोष्ट ऐक
आटपाट नगरात एक विचित्र कायदा होता कोणताही राजा फक्त एक तप ( बारा वर्षे ) राज्य करेल त्या मूदतीनंतर त्यांची रवानगी नगरीच्या नदीच्या पल्याड असलेल्या निर्जन, भयाण हिंस्र श्वापदे असलेल्या अरण्यात केली जाईल.
मूदत पूर्ण होताच आजपर्यंत प्रत्येक राजाला जबरदस्तीने नावेत बसून न्यावे लागे. ....ते ओरडायचे रडायचे विनवण्या करायचे पण प्रजा नियमाला बांधिल होती.
पण आज मात्र विलक्षण घङत होते राज्यकारभाराची मूदत पूर्ण करून राजा योगेंद्र अतिशय आनंदात , प्रसन्न चित्ताने, स्वखुशीने नावेतून पलिकडे निघाला होता. प्रजा आश्चर्यचकित होऊन हा निरोप समारंभ पहात होती.
नावेच्या नावाड्यासाठीही हे सर्वस्वी नवीन होते.
न राहवून तो राजाला म्हणाला ,
," राजन आजपर्यंत तूमच्या ईतक्या समाधानाने राजीखूशीने या शेवटच्या प्रवासाला कोणीच निघाले नाही. "
"आपल्या शांत असण्याचे रहस्य काय ? ??" "आपणास त्या निबिड , भयाण जंगलाची भीती नाही का वाटत ? "
राजा उत्तरला, " अजिबात भीती नाही वाटत मला. गादीवर बसतानाच मला माहीत होते की एक दिवस मला त्या भयाण अरण्यात जावेच लागणार आहे.
आदर्श राज्यकारभार करताना मी एक मात्र केले पलिकडच्या अरण्यावर पण लक्ष दिले .माझ्या कालावधीत मी तेथे नंदनवन फूलवले .आता त्या निर्जन जंगलाची मला भीती नाही उरली. मी कृतार्थ आहे.
कारण या "शेवटाची" मी कधीच "सूरूवात" केली होती .
मंडळी आता तूम्ही तरूण आहात, निवृत्तीच्या अरण्याचा विचारच काय स्वप्न ही कधी पडत नसेल . परंतू हीच योग्य वेळ आहे पलिकडे आपल्यासाठी नंदनवन फूलवून ठेवण्यासाठी.
आजपासून वानप्रस्थाश्रम चे नियोजन करा
कोणाकडून अपेक्षा ठेवाल तर अपेक्षाभंगाच्या दूखाची तयारीही ठेवा .
महीन्याच्या मिळकती मधील एक हिस्सा बाजूला ठेवा. समाजऋण फेडण्यासाठी.
पिढी दर पिढी वेगवान होत जाणार्या आयूष्याच्या गाडी बरोबर Adjust व्हायला शिका. किंवा Add just करा .
दिलेले काढू नका , केलेले आठवू नका.
असे केले तर "निवृत्ती " होईल "प्रवृत्ती " व ठरेल "आवृत्ती " नित्य नव्या जीवनाची.
तर मग आजच करूया एका शेवटाची सूरूवात
मी केलीय तूमचं काय ?
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे